Translate

China Diary लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
China Diary लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, २४ नोव्हेंबर, २०१९

प्रतिसादाची साखळी

प्रतिसादाची साखळी


स्थळ:- होंग-छ्याव रोडवरील एक बस-थांबा, शांग-हाय. 
वेळ:- दुपारी साधारण १२.३०
पात्रे:- आजी, आजोबा, २ छोटी  नातवंडे आणि मी . 

पार्श्वभूमी:- दुपारची वेळ असल्याने रस्त्यावर विशेष वर्दळ नाही .

घटना :- 

थांब्याच्या डावीकडून एक बऱ्यापैकी वृद्ध जोडपे बस थांब्याच्या दिशेनं येतं.  
आजोबांच्या हातात  सामानाची थोरली पिशवी. 
आजीचा हात  धरून  २ नातवंड
मुलगी साधारण ५ वर्षांची, मुलगा साधारण ३ वर्षांचा.  

इतक्या लवाजम्या सकट पोहचे -पोहचे पर्यंत नजरेसमोरून त्यांची बस जाते
हात दाखवून  सुद्धा न थांबता !

आजोबा सामानाची पिशवी रस्त्यावर टेकवतात. 
पुढच्या बसची वाट पाहत रस्त्यावरच  उभे राहतात. 
आजी मात्र बस थांब्याच्या सावलीतील खुर्चीवर टेकतात. उसासा सोडून ! 

आजी-आजोबा दोघेही  "जरा श्वास"  घेत असतात .   

ती गोजिरवाणी नातवंड  आजीच्या आसपास तिथेच खेळू लागतात. 
बघतच बसावं असं त्याचं एकमेकांबरोबर  खेळण. 
कोणत्याही खेळण्याशिवाय ! 
निरागस, लोभस !

थोडा वेळ  ते तसंच खेळत राहतात. 

(काही मिनिटा नंतर )

.........................
खेळता खेळता अचानक  नात रस्त्यावरच धावते.  
बस थांब्याची सावली सोडून
उत्सुकतेने सामानाच्या पिशवी मध्ये डोकावते  ! 

आजी लगेच  मागून धावत जाते.  
नातीच्या पाठीवर एक जोरात फटका  बसतो. 

नातीच्या डोळ्यातील  उत्सुकतेची जागा अश्रू घेतात. 

खेळ मोडूनच जातो ;
आणि त्याबरोबर अजून  काय काय...

नातीला काही कळतंच नाही, 
असं का? काय चुकलं? 
...........................
मलाही नाही कळलं, 
कुणाचं चुकलं ???

खर तर कोणाचंच  नाही....

की कोणाचं तरी ?

" भलत्याच " कुणाचं ????

.........................................................................................
असंच एकदा शांग- हाय बस थांब्यावर बसची वाट पाहत होते. तेव्हा हे सगळं नजरेसमोर घडलं. ती छोटी मुलगी आणि तिचा भाऊ याचं खेळणं कधी थांबूच नये असं वाटत होत. पण अचानक रसभंग झाला. आणि खूप सारी अस्वस्थता, प्रश्न घेऊन घरी परतले. 

खर तर ह्या घटनेचं चीनच काय, भारत किंवा कोणत्याही विकसनशील देशात नाविन्य नाही. भारत, चीन  इ.  देशांतील  जे काही समान धागे आहेत त्यापैकी एक म्हणजे इथं जे अस्वस्थ करून गेलं  ते ! त्याची पाळमुळ  आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय  इ. इ. कुठे कुठे आहेत. त्याचबरोबर एक असाही विचार आला की, आपण जो समोरच्या माणसाला प्रतिसाद देतो, react होतो (सकारात्मक, नकारात्मक) ते कित्येक गोष्टींचा परिपाक, परिणाम  असतं. मग हे react  होणं, ही प्रतिसादाची साखळी कुठल्या तरी तशाच  भावनेतून कुठून तरी सुरु झाली असेल का?

ह्या अशा सगळ्या परस्परसंबंधित, परस्परावलंबी  सहज  न दिसणाऱ्या साखळ्या आहेत  का ?

गुंताच आहे सगळा........

आनंददायी,  सकारात्मक, जाणीवपूर्वक जगणं असेल तर सुंदर वीण नाहीतर, नुसताच  गुंता वाढत जाणारा !

वाईट अशासाठी वाटतं की, बऱ्याचदा असे कोरी पाटी असलेले लहानगे, विशेषतः मुली, त्याची शिकार होतात. त्यांच्या पाटीवर न पुसले जाणारे ओरखडे उमटतात.

मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०१३

Meeting Gurudev in China

I had an opportunity to watch Rabindranath Tagore’s play “Visarjan” (Sacrifice), in Mandarin ( Chinese )!

It was awesome!

I watched the play in China which, unfortunately, I couldn't watch in India. :-)

It was a tribute to Indian artists by Chinese artists!

Young Chinese artists had all presented Visarjan beautifully. They had actually brought all the characters alive. All the characters’ Indian names: Aparna, Jaisingh, Raghupati, Govinda and Gunavati etc. were sounding very sweet, when uttered in Chinese diction:-). 

Moreover, it was a great pleasure to watch Chinese artists in Indian costumes playing many roles such as king, queen, and priest.

And besides the stage, there was a huge screen displaying English subtitles. What made me really disappoint was unnecessary insertion of contemporary Bollywood songs:-(. What a terrible flop!

Yet, one thing was clear from the acting that the artists had definitely understood the subject of the play and had well understood what Rabindranath Tagore wanted to express through Visarjan ! 

I met 'Tagore' at the underground museum located at the base of the famous ' Oriental Pearl Tower' immediately after I landed in Shanghai !

Shanghai's history has been displayed beautifully in this museum through human wax statues, antique things and atmosphere. I saw an identical statue like Tagore, in a sitting position discussing things, under the narration "Foreigner in Shanghai". But later I witnessed Tagore with his name engraved on the signboard on Shanghai's Yan-an highway, as a tribute to the fact that he Tagore stayed here.

When Rabindranath Tagore's 'Gitanjali' won the noble prize, the Chinese translation of Gitanjali was published just in two years !

Chen Duxiu, one of the founders of the Communist Party of China had done the first translation. The pride behind this was seen in the fact that Tagore was the first Asian to win a Noble prize for literature. 

Tagore got invitations from many Countries including China, to visit then. During an interview session, while aboard the ship to China Tagore said to the reporters, "When I got the invitation from china, I thought this is an invitation to my Country India. I shall accept this as a humble son of my nation. I wish that my visit to China bridge the cultural and spiritual gap between the two Countries. Even we should invite Chinese intellectuals to our Country and exchange of ideas and thoughts should take place. I will get immense satisfaction if I would be able to accomplish this.

Gurudev Rabindranath Tagore actually set foot in China, our Eastern neighbor, on 12th April, 1924. He was 63 years old then. He stayed for two months in China. 

During his stay he visited main cities of China namely Beijing, Shanghai, Hangzhou and Nanjing. 

This visit to China was in the circumstances of Governmental transformation and in the times of unrest. The social unrest among Chinese students was a cause of discussion everywhere. In 1920, Tagore had written in his Article about opium plantations in British India and its export to China stating “a trade of killing Chinese people".

The young Chinese generation was highly influenced with the western ideology, technology and science. 

The communist party of China was established in 1921. This phase in the history of China was that of East verses West, Modernization verses Tradition. The modern thinking Chinese were behind imitating west. 

To such kind of people, Tagore with his staunch following of eastern culture values and thinking, was actually seen as a threat. And for some he seemed like a spiritual guru in sweeping robes and a flowing beard, trying to preach traditional values. Due to this Tagore's visit became an object of criticism. To sum it up Tagore's welcome in China was that of mixed reactions.

Tagore's idea of a unified Asia did not go down too well with nationalist patriots in China in the early 1920s. His Pan-Asian view may seem a bit utopian now - or even then. States Bivash Mukherjee, who made a documentary film, (Gurudev: a Journey to the East). The same scene was seen in India too.

During his Shanghai visit Tagore stayed in his friend Xu Zhi Mo's house (Today this house does not exist as it was demolished to make way for flyover). 

The famous Chinese literary legends Guo Mo Ruo, Hu Shi and Xu Zhi Mo while studying in Europe and America, had read the English version of Tagore's writings. While Xu Zhi Mo was studying in Cambridge in 1923, in England Tagore's literature was globally recognized. Xu Zhi Mo, who was an ardent fan of Shelly and Keats, fell in love with Tagore. 

Friendship between Xu Zhi Mo and Tagore is considered as an important chapter in the literary history of India and China. Actually speaking Tagore was 27 years older than Xu. Yet age was never a barrier in their friendship. Tagore always use to introduce Xu as "his son and his wife as his daughter-in-law" to his guests. Xu also used to be translator during Tagore's stay in China. A Chinese name as, "Taige er" (as it is close to the Chinese pronunciation), was also given to Tagore.

In his first speech in Shanghai (1924), Tagore says, “ that a poet’s mission is to attract the voice which is yet inaudible in the air; to inspire faith in the dream which is unfulfilled; to bring the earliest tidings of the unborn flower to a skeptic world."

Surprisingly, it is very difficult to locate newspapers and magazine articles on Tagore visit to China. Some articles have been possibly destroyed and others have been lost. 

The same is the status for lectures given by Tagore. Few lectures have been published in Vishwa Bharti and mostly all have been published as “Tagore’s talk in China". 

But, Tagore put a ban on distribution of this book, due to some unknown reasons. The next year new edition of this book was published with drastic changes. It is very difficult to hunt for the hidden facts of the past.

It is very difficult to gauge the reasons behind the decisions of great men who have the power of changing nation’s future, especially the decisions which can change future of a nation, of the people and course of events.

Although Talks in China is one of the significant writings of Tagore in English, it never received the attention it deserved either from Tagore scholars in Bengal or students of India-China relations.  It is quite interesting to note that it was never translated into Chinese although quite a number of Tagore’s other works were translated into Chinese and were well received. Remarks, Shishir Kumar Das, author of the book, "A history of Indian literature”.

Tagore, an ambassador in cultural exchanges between China and India," visited Shanghai again after 5 years in March 1929 as part of his trip to Japan and America. 

Tagore's third and the last visit to China was in June 1929. 

In comparison to the first visit, the last two visits were away from limelight. 

During his all three visits and thereafter also Tagore has always stressed on mutual dialogue between India and China. 

In 1937, the “China Bhavana” established in Vishwa Bharthi was an actual example of execution of expressed ideas. The basic idea, concept is the same in both of these two cultures. 

While we say “Vasudhaivam Kutumbakam", Chinese say “shi jie da tong". Language may be different, but the standpoint is the same. Later on in 1937, when Japan attacked China, it was found that Tagore had expressed his concern and sorrow to his friend.

After the establishment of the People's Republic of China, in 1950s Tagore's writing had become very popular. 

Later on, during the Cultural Revolution in 1966-76, Tagore’s literature was read in secret. This was stated by Zhao Lihong, a famous writer and Vice-chairman in Shanghai- Writers Association, in an interview taken by Chitralekha Basu. Zhao frankly admits to the impact of Tagore in his style of writing. 

In 1979, once again Tagore's literature gained attention. Translation project that comprised 20 volumes and 10 million words had started. The triggering factor was " Little Bird, where are you going?” an article based on these words by Zhao. In this the writer has expressed the impact of Tagore on Chinese poets of his times. 

And, Now,Tagore's 150th Birth Anniversary !!!

In today's times, existing Chinese leadership admits the importance of Rabindranath Tagore. During his visit to India in 2010, Chinese premier Wen Jiabao paid a visit to Tagore International School in Delhi. In an interactive session with him, he said, "Tagore had a great influence on the great literary figures in China. Hence Tagore's name has reached in each household in China".

Today, the young generation, shares romantic poems of Tagore to their valentine through blogs on the internet. In spite of the variety in today's times, young minds are attracted towards Tagore's writings. 

In Peking University, more than 50 academics are engaged in researching and guiding students of Tagore's work. According to the vice-director of the Center for India Studies at Peking University, “Tagore is especially significant in these times of shifting global power. Tagore was the epitome of Eastern ideals. He was the hope of the East at a time when there was no challenge to Western leadership."

All over the World the year 2010-11 was celebrated as Tagore's birth anniversary. 

In China, it has a special importance because; there is a cultural exchange between the Countries, who are supposed to be strong competitors for becoming future superpower. Reading of Tagore's literature, films and conferences, an educational exchange of ideas and thoughts (Tagore International School and Jin Yuan Senior High School in Shanghai) etc and through all those media Tagore has once again reached to all over the World. 

As a part of birth anniversary celebrations in Shanghai, Then, President of India, Smt. Pratibhatai Patil unveiled a statue of Rabindranath Tagore. This is located adjacent to Tagore's friend Xu Zhi Mo's house in central Shanghai. A session of reading of Tagore's translated poems was held by Shanghai Writer's Association and Indian Consulate in Shanghai. 

We heard Gurudev in Chinese, in English, in Bengali and in Marathi language too !!! 

I had the privilege to present Tagore's “O Dekhin Hawa", translated as "Aare dakshinechya varya, Aare vatsaru varya" by the famous Marathi writer P. L. Deshpande. Now, this is for sure that again, a wave of Tagore's literature is seen to have taken charge in Chinese Art and Literature circle!!

शुक्रवार, ११ ऑक्टोबर, २०१३

प्रतिसादाची साखळी


स्थळ:- होंग-छ्याव रोडवरील एक बस-थांबा, शांग-हाय.

वेळ:- दुपारी साधारण १२.३०

पात्रे:- आजी, आजोबा, २ छोटी नातवंडे आणि मी .

पार्श्वभूमी:- दुपारची वेळ असल्याने रस्त्यावर विशेष वर्दळ नाही .

घटना :- थांब्याच्या डावीकडून एक बऱ्यापैकी वृद्ध जोडपे बस थांब्याच्या दिशेनं येतं. आजोबांच्या हातात सामानाची थोरली पिशवी. आजीचा हात धरून २ नातवंड. मुलगी साधारण ५ वर्षांची, मुलगा साधारण ३ वर्षांचा.

इतक्या लवाजम्या सकट पोहचे -पोहचे पर्यंत नजरेसमोरून त्यांची बस जाते. हात दाखवून सुद्धा न थांबता !

आजोबा सामानाची पिशवी रस्त्यावर टेकवतात. पुढच्या बसची वाट पाहत रस्त्यावरच उभे राहतात. आजी मात्र बस थांब्याच्या सावलीतील खुर्चीवर टेकतात. उसासा सोडून !

आजी-आजोबा दोघेही "जरा श्वास" घेत असतात. 
 
ती गोजिरवाणी नातवंड आजीच्या आसपास तिथेच खेळू लागतात. बघतच बसावं असं त्याचं एकमेकांबरोबर खेळण. कोणत्याही खेळण्याशिवाय ! निरागस, लोभस !

थोडा वेळ ते तसंच खेळत राहतात. 

(काही मिनिटा नंतर ) 

खेळता खेळता अचानक नात रस्त्यावरच धावते. बस थांब्याची सावली सोडून. 

उत्सुकतेने सामानाच्या पिशवी मध्ये डोकावते ! 

आजी लगेच मागून धावत जाते. नातीच्या पाठीवर एक जोरात फटका बसतो. 

नातीच्या डोळ्यातील उत्सुकतेची जागा अश्रू घेतात. खेळ मोडूनच जातो ; 

आणि त्याबरोबर अजून काय काय...

नातीला काही कळतंच नाही, असं का? काय चुकलं? 

........................मलाही नाही कळलं, कुणाचं चुकलं ??? 

खर तर कोणाचंच नाही....
की कोणाचं तरी ?" भलत्याच " कुणाचं ???? .
...................................................................................................................................................................

असंच एकदा शांग- हाय बस थांब्यावर बसची वाट पाहत होते. तेव्हा हे सगळं नजरेसमोर घडलं. ती छोटी मुलगी आणि तिचा भाऊ याचं खेळणं कधी थांबूच नये असं वाटत होत. पण अचानक रसभंग झाला. आणि खूप सारी अस्वस्थता, प्रश्न घेऊन घरी परतले.

खर तर ह्या घटनेचं चीनच काय, भारत किंवा कोणत्याही विकसनशील देशात नाविन्य नाही. भारत, चीन इ. देशांतील जे काही समान धागे आहेत त्यापैकी एक म्हणजे इथं जे अस्वस्थ करून गेलं ते ! 

त्याची पाळमुळ आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय इ. इ. कुठे कुठे आहेत. 

त्याचबरोबर एक असाही विचार आला की, आपण जो समोरच्या माणसाला प्रतिसाद देतो, react होतो (सकारात्मक, नकारात्मक) ते कित्येक गोष्टींचा परिपाक, परिणाम असतं. मग हे react होणं, ही प्रतिसादाची साखळी कुठल्या तरी तशाच भावनेतून कुठून तरी सुरु झाली असेल का?

ह्या अशा सगळ्या परस्परसंबंधित, परस्परावलंबी सहज न दिसणाऱ्या साखळ्या आहेत का ?

गुंताच आहे सगळा........

आनंददायी, सकारात्मक, जाणीवपूर्वक जगणं असेल तर सुंदर वीण नाहीतर, नुसताच गुंता वाढत जाणारा !

वाईट अशासाठी वाटतं की, बऱ्याचदा असे कोरी पाटी असलेले लहानगे, विशेषतः मुली, त्याची शिकार होतात. त्यांच्या पाटीवर न पुसले जाणारे ओरखडे उमटतात.

मंगळवार, २१ मे, २०१३

Beijing mei awara hoon


On one of the summer evenings in August 2008, we were at Summer Palace, Beijing. We were about to go back home then suddenly heard the familiar tune of "awara hoon"( popular bollywood song).Obviously, we started to walk towards that 'sound of music'. The singer was trying to sing it wholeheartedly. Although lyrics were not perfect, his efforts were admirable....

Chinese love Bollywood music. They like Raj Kapoor's movies.

This is a video clip, an effort to catch those efforts in. :-)




रविवार, १९ मे, २०१३

निरोपाच्या कातरवेळी ...

(१९ ऑगस्ट 1२ च्या संध्याकाळी, कातरवेळी, शांघायचा निरोप घेताना डोक्यात उठलेलं विचारांचं काहूर. त्याला मोकळी करून दिलेली वाट).


घराला कायमचं bye-bye करून airport कडे निघालोय. बिल्डींग मधून निघताना नेहमीची, हसतमुख, co-operative  receptionist said, "bye -bye". I told (my 5 year old son) Arhan to say,  bye-bye. But I myself couldn't say bye-bye to her. गळ्यात काहीतरी घट्ट अडकलं होतं. डोळ्यातल्या पाण्याने बांध सोडून गालाचा रस्ता धरला. Just waved my hand towards the receptionist and sat in the vehicle. धारा थांबत नाहीत.

एक स्वप्न संपल्यासारख वाटतंय. खाडकन एखादं  दार बंद झाल्यासारखं वाटतंय. ३ हून जास्त वर्ष होतो इथे. Time flies fast !

आज सकाळी अर्हनला नवीन hot-wheels ची गाडी आणली. तो तिच्याशी खेळता-खेळता Chinese मध्ये संवाद करत होता. त्यात तो त्याच्या Fang-Si -Han या चीनी  मित्राशी बोलत होता, त्याला ती गाडी दाखवत होता. त्याबद्धल सांगत होता.  This poor kid does not know  he will not show that car to Fang-Si -Han, as we are leaving Shanghai. 

मी त्याला म्हटलं, "bye कर घराला".  त्याने विचारलं, " का ? ". I couldn't say anything. 
 
There are sweet memories with people, places. Feeling sad that I won't see these people again. Especially Ayi, CSS friends, Arhan school teachers, his friends, veg. shop vendor etc. etc. the list is loong.I got joy, happiness, friends in the city. I became rich with experiences. कुणाकुणाचा निरोप घेऊ ? मला झेपणारच नाही निरोप घेणं. हे घर, इथल्या खिडकीतून दिसणारा सूर्यास्त. ह्या घराच्या भिंती, दारं अर्हनच्या भावनाविश्वाचे ठसे घेऊन उभ्या आहेत. त्याही उगाच हळव्या झाल्यासारख्या वाटताहेत. संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळी, स्वयंपाक करताना किचनच्या खिडकीतून समोरील बागेतून, कानावर पडणारं ते, " आंखे खुली हो या हो बंद " हे गाणं. आणि त्याच्या तालावर पाश्चात्त्य पद्धतीने नाचणारे चीनी लोकं. कोण जाणे एखाद्या बेसावध संध्याकाळी हुरहूर लावून जातीलही.

खूप प्रेम, जिव्हाळा, प्रगल्भता दिली या शहरानं. सगळचं काही सुखकर होतं असं नाही, पण जे त्रासदायक होतं ते आत्ता आठवावसं वाटत नाही. आठवतच नाही.

असो. हे चालायचंच. ह्या अस्तित्वाच्या खुणांचा प्रवास अनंत काळापासून सुरुच  आहे. तो राहणारचं. मला अशासाठी छान वाटतंय की, मी शांघायच्या खुणा स्वतःबरोबर घेऊन निघाले आहे  आणि माझ्या परीने केलेल्या छोट्याशा कामाच्या खुणा इथे सोडून जाते आहे. परत नक्कीच येऊ. पण, तरीही ह्या attachments, ह्या न दिसणाऱ्या जुळलेल्या तारा आता जाताना इतक्या स्पष्ट दिसताहेत. एकदम मोठ्ठ झाल्यासारखं वाटतं.

सगळच एकूण अशाश्वत आहे ही जाणीव. हळूहळू दोरी पुढे सरकते. ती कधी कधी, कुठे नेईल हे  ठामपणे आपण नाही सांगू शकत. विचार केला  वाटतं, हे कालचक्र भराभर फिरतंय आणि आपण मात्र इतकं रमतोय  की जणू हे सगळं कायम असणार आहे. हे हळवे क्षणांचे घाले आठवण करून देतात, सांगतात, " प्यारे, Nothing is permanent. Live truly, fully & spread happiness. 

आता लिहिल्यावर बरं वाटतंय. अजून डोकं जरा दुखतच आहे.
 पण अश्रुधारांना logical वाट मिळाली.

नवीन ठिकाणी पुन्हा settle ही होतो. जुनं इतकं हळवं करतही नाही. पण हे क्षण कसे अचानक हल्ला करतात आणि आपला ताबा घेतात हे कळतच नाही. 

हे ही अशाश्वतच.
पण मी हे जगले, अनुभवले म्हणून आनंदी !!! 



     

गुरुवार, १८ एप्रिल, २०१३

रामनवमी !

शांघाय मध्ये असताना रामनवमीच्या दिवशी पडलेला हा प्रश्न.  त्याचे उत्तर डायरी लिहून सोडवले. इथे प्रसिद्ध करताना थोडेफार संस्कार केलेत त्यावर.

रामनवमी. माझा आवडता दिवस, आतापर्यंत उण्यापुऱ्या तीसएक रामनवम्या अनुभवल्या. अनुभव एकच. आनंद, प्रसन्नता, चैतन्य देणारा दिवस ! सहज डोक्यात विचार आला, का बरं या दिवशी नेहमीच इतके उत्साही, आनंदी वाटते ? आणि, शोधता-शोधता, निसर्ग त्यावर आधारित मानवनिर्मित संस्कृती, त्यातून होणारे संस्कार अशा एक एक परस्परवलंबी साखळ्या उलगडत गेल्या.  विचार करता-करता रामनवमीशी जुळलेली नाळ, असलेले नातं उलगडत गेलं, सापडलं. मन फ्लशबक मध्ये गेलं.

ठसा उमटवून गेलेली पहिली रामनवमी असावी ही. लहान असताना, (बहुधा ४ -५ वर्षांची असताना) रामनवमीला आम्ही गावाला जायचो. गावाला घराच्या अगदी समोरच रामाचं मंदिर आहे. त्यामुळे सगळा सोहळा अगदी बारकाईने अनुभवायला मिळायचा. रामनवमीच्या आदल्या रात्री, आमचं घर आणि मंदिरासामोरील रस्त्यावर पताका लावल्या जायच्या. त्या पताका तयार होत असताना पाहायला मिळायच्या. कागदापासून तयार केल्या जाणाऱ्या, त्रिकोणी आकाराच्या, विविधरंगी पताका ! सगळे रंग शिस्तीत एकापाठोपाठ उभे जणू. ते रंगीत त्रिकोणी तुकडे खळीने सुतळीला एकमेकाशेजारी डकवले जायचे. एक एक पताका येवून सुंदर तोरण बनायचे. आत्ताआत्तापर्यंत जमिनीवर असणारे ते छोटे त्रिकोणी तुकडे. बघताबघता त्यांची माळ व्हायची आणि ते एकदम उंच, दूर जायचं. आज ती पताका मला, लग्नानंतर परदेशात वास्तव्य करणाऱ्या एखाद्या मुलीसारखी वाटते. मुलगी दूर, उंच गेल्याचं कौतुक आणि मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी हळहळही !

http://mellanoandcompany.files.wordpress.com/2012/10/making-marigold-lei.jpg

रामनवमीच्या दिवशी मंदिरात आणि घरातही विशेष लगबग असायची.  मंदिर सजलं जायचं. मंदिराच्या दारावर  झेंडूची फुलं आणि आंब्याची पानं एकाआड एक ओवून तोरण बांधलं जायचं. उत्सवमूर्तीला नवीन कपडे, दागिने, फुलांच्या माळा चढवल्या  जात. गाभाऱ्याबाहेरील मोठ्या मंडपात रामाचा पाळणा अडकवला जायचा.  कीर्तनाचा कार्यक्रम असायचा. मग कीर्तनकारांना बसण्यासाठी किंवा उभं राहण्यासाठी विशेष जागा निवडली जायची. गाभाऱ्यात मूर्ती, मुख्य मंडपात रामाचा पाळणा आणि त्याच्या दोन्ही बाजूला भक्तगण. एकीकडे स्त्रिया, दुसरीकडे पुरुष आणि मध्यभागी रामाच्या मूर्तीकडे तोंड करून उभ्या ‘बंग’ बाई अशी बैठक व्यवस्था असे. तेव्हा मंदिरात रामनवमीला बंग नावाच्या बाई कीर्तन सांगायला येत. कीर्तन संपल्यावर त्यांना सगळेच नमस्कार करायचे. मला त्या फार आवडायच्या. का ते आता नेमके माहिती नाही. कदाचित त्यांची कीर्तन सांगण्याची शैली, त्या म्हणत असलेली गाणी, भजनं आवडत असतील. त्या वयात या सगळ्यातून काय कळत होत, ते तो रामच जाणे ! असो, ते काहीही असो. पण अजूनही सगळ चित्रासारखं डोळ्यापुढे उभं राहतं.

आठवणींचा दुसरा 'रेशीम' धागा दुसरीत असतानाचा.  आमच्या देशपांडे बाइंनी वार्षिक स्नेहसंमेलनासाठी म्हणून गीतरामायणातील "आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे" या गाण्यावर, आमचा नाच बसवला होता. त्याची हमखास आठवण या दिवशी होते. आणि nostalgic व्हायला होत. आजही ते ऐकले तरी आपसूक अंगात लय येते, हात -पाय ठेका धरतात. पुढे नंतर कळत्या वयात, पुणे आकाशवाणीवरून रामनवमीच्या दिवशी गीत रामायणाचे सूर कानी पडायला लागले. शब्दांमागील अर्थ उमगू लागले. ते शब्द, ते संगीत, बाबुजींचा आवाज सगळेच मोहिनी घालू लागले. मग गीतरामायण हा एक हळवा कोपरा, weak -point होऊन बसला. अगदी आजही आता भारताबाहेर असले तरी रामनवमी म्हटले कि गीत-रामायण ऐकणे हा एक दिवसाचा ठरलेला, अविभाज्य कार्यक्रम. पुन्हा-पुन्हा ऐकत रहावं वाटणारं ! गदिमा आणि बाबुजीं च्या निर्मिती मागचं कोड, गूढ अजून न उलगडलेले !

सुखद स्मृतींचा हा तिसरा धागा माध्यमिक शाळेत असतानाचाच.  मराठीतला चैत्र शुद्ध नवमीचा दिवस, इंग्रजी महिन्याप्रमाणे पाहिले तर साधारण मार्च-एप्रिल. हा शाळांचा परीक्षांचा मौसम. परीक्षा आणि नंतर सुट्ट्या! सहीच ! रामनवमीच्या दिवशी, खरं तर, मे महिन्याच्या सुट्ट्यांची चाहूल लागायची. दुपारच्या वेळेला कैऱ्या, बोर, चिंचा, आवळे, पेरू असा मेवा घेऊन शाळेबाहेर बसलेल्या मावशी, काका दिसायचे. उन्हाळ्यातल्या या मेव्याची, त्यांच्या चवींची, त्यांच्याशी निगडीत बाल-आनंदाची, येऊ घातलेल्या आंब्यांच्या आगमनाची कुठेतरी नोंद होत असावी. आनंदाची चाहूल देणारा तो दिवस, ते क्षण !

अजून एक म्हणजे शाळेत जायच्या रस्त्यावर एक राम मंदिर लागायचे. तिथे रामनवमीला भरपूर वर्दळ असायची. दुपारी १२ चा सुमार म्हणजे रामाला पाळण्यात घालणे इत्यादी सोहळा अगदी भरात असण्याची वेळ.मग जाताजाता कानावर भजनं, गाणी पडायची. जरा थांबून मंदिरात डोकावले तर सजवलेले मंदिर, नटून-थटून आलेल्या बायका, त्यांच्या बरोबरच्या लहान-सहान मुली, रंगात आलेले कीर्तनकार आणि राम-सीता आणि लक्ष्मणाच्या नटवलेल्या मूर्ती असं काय-काय दिसायचे. सगळे तल्लीन झालेले. फार सुरेख दृश्य, अनुभव.

चौथा धागा म्हणजे त्या दिवशी घरी केला जाणारा विशेष स्वयंपाक. तो फक्त रामनवमीचाच बेत असतो, इतर कोणत्याच दिवशी नाही. झुणका (चोकोनी सुबक वड्या पाडलेला, त्यावर कोथिंबीर, खोबरे, खसखस भुरभुरलेला ) टरबूजाचं शिकरण, कैरीच पन्हं, आणि घडीच्या मऊ सुत पोळ्या ! आता, लग्न होऊन भारताबाहेर राहत असल्यामुळे, आईच्या हातचा ऐता असा हा मेनू खायला मिळत नाही. त्यामुळे तो पण रामनवमीशी निगडीत अनुभवांच्या मालिकेतील एक सुखद कप्पा ! काही खाद्य पदार्थांच्या अनुभवलेल्या चवीपण कशा जागा, प्रसंग, वेळ, सोबतची माणसे यांच्याशी समीकरणे जमा करत जातात. ती चव, तो प्रसंग, ती वेळ, बरोबरचे सोबती अस क्वचितच पुन्हा जमून येते. आणि नुसती ती आठवण आली तरी सगळे एखद्या फोटो प्रमाणे सगळच स्मृतीपटलावर जिवंत होत. 

आता वाटतंय की, निसर्गात होणारे बदल, जसे कि चैत्र -पालवी, त्यामुळे एकूणच वातावरणातला उत्साह, त्याला अनुरूप अशी संस्कृती (विविध सामाजिक संस्था, खाद्य संस्कृती, प्रथा- परंपरा , सण-वार, संगीत इत्यादी), ह्या संस्कृतीच्या माध्यमातून मनावर होत जाणारे संस्कार याचा काही संबध असेल का? कदाचित, नव्हे नक्कीच, या सगळ्याचाच हा एकत्र परिणाम असू शकतो. रामनवमीच्या दिवशी ह्या सगळ्याच आठवणींचे धागे मनाच्या अंगणात फेर धरतात. समृद्ध अनुभूती देतात.

माझा मुलगा आता तीन वर्षांचा आहे. जमेल तसं रामायण-महाभारतातल्या गोष्टी त्याला सांगायचा प्रयत्न करत असते. त्याला थोडफार समजतही असाव. कारण सध्या त्याच्या रुपात आमच्या घरात कधी शंकर, कधी हनुमान, कधी कृष्ण, तर कधी राम वावरत असतात. म्हणजे त्या गोष्टी ऐकून, पुस्तकातील चित्र पाहून तोहि त्या-त्या कथानायका प्रमाणे स्वतःला नटवायला सांगतो आणि अभिनयही करतो. मग धनुष्य नसले तर कपडे अडकवायचा hanger पण धनुष्य म्हणून चालतो. त्या काही क्षणासाठी तो त्या भूमिकेत असतो. थोडक्यात काय, आता त्याला रामाची थोडी ओळख आहे. आज रामनवमी म्हणून त्याला सकाळी उठल्यावर सांगितले, " आज रामाचा वाढदिवस !", सांगण्याचा हेतू हाच कि आपलं  निसर्गाशी असणार नाते, परस्परावलंबन तुला ओळखता येवो. मानवनिर्मित संस्कृतीमागे हा जो निसर्ग बदल स्वीकारण्याचा, साजरा करण्याचा विचार आहे तो समजण्याची ताकद तुला मिळो. हा रामनवमीचा दिवस मला खूप खूप आनंद देऊन जातो. तसाच आनंद तुलाहि मिळो. 

शुक्रवार, ३० नोव्हेंबर, २०१२

महाभिंतीच्या पलीकडचे-अलीकडेचे!


 (पूर्वप्रसिद्धी "अर्थपूर्ण", दिवाळी २०१२ .)
एक भारतीय, गृहिणी, आई, सामाजिक कार्यकर्ती, भारतीय दूतावासातील अधिकाऱ्याची पत्नी अशा विविध भूमिका बजावताना दिसलेल्या चीनचे अंतरंग लेखिकेने येथे प्रकट केले आहेत. भारत आणि चीन या दोन देशांच्या भिन्न राजकीय व्यवस्था आणि परिणामी भिन्न आर्थिक धोरणे, त्यांची अंमलबजावणी करण्याची वेगळी पद्धत ह्या मुख्य धाग्याच्या अवतीभवतीची ही सगळी गुंफण विणून घेतलेला हा आर्थिक-सांस्कृतिक परामर्श आहे.

गेली पाच वर्षे मी चीनमध्ये राहिले. कॉन्सुलर स्पौझेस ऑफ शांघाई या संघटनेची मी उपाध्यक्ष होते. संघटेनच्या माध्यमातून आम्ही समाजकार्य करत होतो. सातत्याने पाच वर्षे चीनमध्ये असताना बैजिंग (बेईजिंग) आणि शांग-हाय या दोन शहरांमध्ये प्रामुख्याने व त्याव्यतिरिक्त नानजिंग, निंगबो, शीआन, लुओयांग, पुथुओशान, हांगचौ, सुचौ, लीयानयुनगांग, इत्यादी छोट्या-मोठ्या शहरांमध्ये जाता आले. 

चीनी शहरांचे प्रथम दर्शन 

कोणत्याही शहराच प्रथम दर्शन होते ते त्याच्या विमानतळावर, रेल्वे किंवा बस स्थानकावरच. ऑगस्ट २००७ मध्ये आम्ही बैजिंग मध्ये प्रथम पोहोचलो ते हौंगकौंग मार्गे, अत्याधुनिक अशा हौंगकौंग-बेईजिंग रेल्वेने. त्यामुळे बेईजिंगचे प्रथम दर्शन झाले ते रेल्वे स्थानकावर. स्थानकाच्या बाहेर पडल्यावर प्रथम जरा बावरल्यासारखे झाले. वेगळा देश, अगम्य भाषा, निराळे दिसणारे अनोळखी लोक... पण एकूण चित्र काही प्रमाणात तरी भारतीय रेल्वे स्थानकासारखेच! तशीच गर्दी, दोन चार अपंग हातात भांडी घेऊन दानाच्या याचनेत, अस्ताव्यस्त सामान पसरून बसलेले लोक, बऱ्यापैकी गजबजाट, लगेच रस्त्याच्या पलीकडे रहदारीने भरलेले रस्ते असं सगळं दिसलं. आणि जरास ओळख असल्यासारखे, हायसं वाटलं. मुंबई, दिल्लीतील रेल्वे स्थानके आणि बाहेरची गर्दी, कोलाहल, घाण इ. अगदी अंगावर आल्यासारखी वाटतात पण इथे तुलनेने सगळ बेताचं होत. 

नंतर मात्र काही महिन्यातच चित्र झपाट्याने बदलताना दिसलं. जसजस ऑलिम्पिक जवळ येऊ लागलं तसं सापाने कात टाकावी तसं बैजिंग बदलले. आणि नंतर ही “ओळखीची” दृश्य लपल्यासारखी झाली ती मुख्य रस्त्याच्या कडेला असणाऱ्या, ग्रेट वॉलची आठवण करून देणाऱ्या, उंच, सुशोभित अशा दगडी रंगाच्या भिंतीमागे! तिथे मात्र ह्या भारतीयांना परिचित चीनच्या खुणा अजून आहेत. अगदी आपल्या चाळी, झोपडपट्ट्या वाटाव्यात अशा घरातून लोक राहताना दिसले. सगळ तसच मात्र शहराच्या सुशोभीकरणात बाधा येऊ नये म्हणून उंच, आकर्षक भिंतीमागे झाकून टाकलेल... सगळ्या जगभरातून लोक येणार म्हटल्यावर छान दिसावं म्हणून, पसारा कोंबून ठेवल्या सारखं! शहरातील भिंतीमागे लपवलेली गरिबी, दारिद्र्य आणि भिंतीपुढे अलिशान परदेशी बनावटीच्या गाड्या सुसज्ज सहा पदरी रस्त्यांवरून धावत असलेल्या दिसल्या. मला तर सुरुवातीच्या काळात चीन सुद्धा भारतासारखाच विषमता असलेला देश वाटला खरतर तसाच आहे. शहरी-ग्रामीण दरी चीनमध्ये सुद्धा दिसली. जरा मुख्य शहरापासून लांब गेलं तरी लगेचच ‘वेगळा’ चीन दिसतो. आपल्यासारखीच खेडी, त्याच्या पुढील शेती, साध्या पारंपारिक वेशातील लोकं, वगैरे. 

पाच वर्षात काही ओळखीचं, काही अनोळखी सारखं भेटतच राहिलं. मात्र चीनी सरकारी धोरणांच्या अंमलबजावणीचा वेग अधिक दिसला. कदाचित, सरकारचे नियंत्रण, पकड असल्यामुळे असेल. अगदी एका रात्रीत होत्याचं नव्हत आणि नव्हत्याचं होत चीनमध्येच होऊ शकतं. याची साक्ष म्हणजे २००८ मधले बेईजिंग ऑलिम्पिक आणि २०१० मधले शांग-हाय वर्ल्ड एक्सस्पो आणि त्याच्या निमित्ताने दोन्ही शहरात झालेला कायापालट हे आहे. 

रस्ते, वीज, पाणी, वाहतूक व्यवस्था अशा मुलभूत पायाभूत सुविधा शहरात तरी अत्यंत सुस्थितीत आहेत. एकूणच चीनमध्ये ज्या वेगाने अतिजलद ट्रेनच (high speed train) जाळं सगळीकडे पसरल आहे ते अवाक करणार आहे. म्याग्लेव (Maglev- Magnetic Levitation) ट्रेन तासाला ३५० किमी वेगाने शहरापासून विमानतळापर्यंत धावते. बेईजिंग, शांग-हाय शिवाय चीनमधील छोट्या शहरांमधील रेल्वे स्टेशन सुद्धा एखाद्या विमानतळाप्रमाणे अत्यंत आधुनिक, स्वच्छ, सुशोभित केली आहेत....पाश्चात्य शहरांच्या तोडीस तोड. 

शांग हाय मधील संध्याकाळी तर “ लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया ” या ओळींची आठवण व्हावी अशा असतात . कृत्रिम दिव्यांचा इतका प्रकाश, झगमगाट कि त्यांच्या माऱ्यापुढे आकाशातले तारे, चांदण्या असं कधी फारसं स्पष्ट दिसलच नाही. शांग-हायला श्रीमंतांचे शहर असं म्हणतात कारण महागड्या शहरांच्या यादीत ते वरच्या क्रमांकावर आहे. या श्रीमंतांच्या शहरात तर परदेशी बनावटीच्या महागड्या गाड्याच मुख्यत्त्वे पाहायला मिळतात. ज्या चालविताना अनेक स्त्रियाही दिसतात. 

चीनी स्त्री शक्ती 

चीनी स्त्री शक्तीचे प्रथम दर्शनाचा हा एक किस्सा सांगण्याचा मोह आवरत नाहीये. बेईजिंग मध्ये असतना मूलाला घेऊन प्रथमच हॉस्पिटल मध्ये गेलो होतो. पोहचलो तर काय हॉस्पिटलच्या पोर्चमध्ये बरीच गर्दी, जोरजोरात भांडणाचे आवाज. स्वाभाविकपणे नजर गेली आणि पाहते तर काय ! एक चाळीशीची बाई एका पंचविशीच्या मूलाला बेदम मारत होती ! चीनी शक्तीच्या या प्रथम दर्शनाने मला अचंभित केलं! 

बाजारात सर्वत्र दुकानदार म्हणून, हॉटेल्स मध्ये वेटर म्हणून किंवा अगदी टोल नाक्यावर चलन फाडणे अशीही कामे स्त्रिया करताना दिसल्या. स्त्रियांचे पोशाख सुद्धा अगदी पाश्चात्त्य पद्धतीचे असतात. असं असूनही, कुणीही “टीपीकल पुरुषी” नजरेने त्यांच्याकडे बघतंय किंवा त्यांची छेडछाड करतय, असं कुठंच आढळल नाही. शांग-हाय, बेई जिंग सारख्या शहरातूनच नव्हे तर इतर ठिकाणी देखील; अगदी रात्री-अपरात्री सुद्धा स्त्रिया निर्भीडपणे वावरताना दिसतात. 

भारताच्या तुलनेने, छोट्या-मोठ्या शहरात स्त्रियांचं स्थान स्त्री-पुरुष समानतेच्या जवळ जाणारे वाटलं. चीनी स्त्रिया अधिक आत्मविश्वासू, निर्भीड, सुरक्षित वाटल्या. त्यांच्याकडेही स्त्रीयांना कौटुंबिक हिंसाचाराला सामोरे जावे लागतेच. पण परिस्थिती आपल्या इतकी वाईट नाही आढळली. 

यामागे चेअरमन माओ ची स्त्रियांच्या प्रगतीस अनुकूल धोरणे, प्रत्येक व्यक्ती स्वावलंबी असलीच पाहिजे या विचाराचा पगडा, किंवा कायद्याचा वचक, भिती असेल. पण या सगळ्यातून आलेली एकूणच आचार-विचारातील शिस्त शहरात पाहायला मिळाली. 

चीनी माणूस आणि शिस्त 

माणूस जडणघडणीत सुद्धा राजकीय व्यवस्था कसा हातभार लाऊ शकते ते भारतीय आणि चीनी माणसातील फरकामुळे अगदी सहज दिसते. 

चीनी माणूस (अगदी कामवाली बाईसुद्धा) दिलेल्या वेळेपेक्षा पाच मिनिटे सुद्धा उशिरा येत नाही. शांग-हाय वुमेन्स फेडरेशन, शांग-हाय चॅरीटी फाउंडेशन या संस्थांबरोबर काम करतानाही एकूण चीनी लोकांची काम करण्याची पद्धत अत्यंत प्रोफेशनल असल्याचं पाहण्यात आलं. आम्हा भारतीयांच्या वेळ पाळण्याबद्धल, दिलेला शब्द पाळण्याबद्धल काय बोलावे? शिस्त चीनी माणसाच्या रक्तात भिनली आहे असे वाटणारे अनेक अनुभव आले. 

शांघाई मध्ये सार्वजनिक बस मध्ये कंडक्टर फक्त लांब पल्ल्याच्या गाड्यांना असतात. बाकीच्या बसमध्ये पुढच्या दराने चढायचे आणि तुमचे कार्ड त्या इलेक्ट्रोनिक मशीनला टेकवायचे कि तुमचे तिकिटाचे नाममात्र पैसे तुमच्या कार्डमधून वजा होतात. कार्ड नसेल तर कॉईन बॉक्स मध्ये पैसे टाकायचे हा साधा नियम लोक प्रामाणिकपणे करतना आढळले. कुणी लक्ष ठेवायला नाही तरी प्रत्येक जण व्यक्तिगत जबाबदारी असल्याप्रमाणे वागताना दिसले. 

बेईजिंग मध्ये असताना, मुख्य रस्त्यवर मध्यभागी किंवा अगदी पादचारी मार्गाच्या शेजारी अनेक गुलाब फुललेले दिसले. पण कोणीही ती फुले तोडताना दिसले नाही. याउलट आपल्याकडे एका शहरात असा प्रयोग केला तर दुसऱ्या दिवशी सकाळ पर्यंत कुंड्याही गायब झाल्या असे चीन भेटीवर आलेल्या एका केंद्रीय नेत्याकडून कळले. 

असं सगळं चीनी लोकांच्या शिस्तीच कौतुक आठवतानाच, समूह मानसिकता आणि कायदा यांचा संबध दाखवणार हा एक किस्सा आठवतोय. भारत औषधनिर्मिती क्षेत्रात चीनपेक्षा पुढे आहे. चीनमध्ये फुफुत्साच्या कर्करोगाचे प्रणाम प्रचंड आहे. प्रदूषण, सिगारेटच व्यसन इत्यादी कारणांमुळे असेल पण त्यावरील उपचारासाठीची औषधे मात्र चीनमध्ये प्रचंड महागडी आहेत. परिणामी हेच शिस्त पळणारे लोक आपल्या भारतीयता मित्रांना भारतातून येताना ही औषधे स्वस्त मिळतात म्हणून आणायला सांगतात. आमचे भारतीय मित्र चीनी मैत्रीसाठी हे करू पाहतात. आता कुणी म्हणेल, भारत आणि चीन युद्ध आणी सीमा ताण असूनही लोक मात्र एकमेकांशी प्रेमाने कसे वागतात? तर, युद्ध, सीमा ताण या गोष्टी सामान्य नागरिकांच्या व्यक्तिगत संबंधात शक्यतो येत नाहीत. जसं पाकिस्तान, भारत एकमेकांना शत्रू राष्ट्र मानतात. पण जेव्हा दोन्ही देशातील सामान्य लोक एकमेकांना भेटतात, बोलतात तेव्हा काही मिनिटातच हे शत्रुत्व विरघळून जाते अस दोन देशातील लोकांचा अनुभव आहे. म्हणून तर “पीपल टू पीपल कॉनटॅक्ट” हे धोरण आपल्या सरकारने स्वीकारले आहे. जितके सामान्य नागरिक एकमेकांना भेटतील तितके गैरसमज दूर व्हायला मदत होते. आणि १९६२ युद्ध हे आपण म्हणतो. चीनमध्ये हे युद्ध फक्त बुद्धिमान वर्गाला माहिती आहे. सामान्य चीनी माणसाला नाही. ते १९६२ च्या घटनेला युद्ध मानीत नाहीत!!! 

तर ही फुफुत्साच्या कर्करोगावरील औषधे विमानातून आणायला कायद्याने बंदी आहे आणि त्यासाठी कडक सजाही होऊ शकते. शांग-हाय जवळ असणाऱ्या वूशी शहरात सध्या कैदेत असलेल्या भारतीयांना अशीच कॅन्सर संबंधित औषधांचा मोठा साठा चीन मध्ये विना परवाना आणला म्हणून अटक झालेली आहे. नियम, कायद्याची भीती ‘स्वतःला’ नसली कि हेच चीनी गैरव्यवहार करतातच! इतके प्रचंड लोकसंख्या असल्यावर समूह मानसिकता लक्षात घेता कायद्याच बडगा का आवश्यक आहे हे कळते. म्हणजे माणूस म्हणून आम्ही भारतीय, चीनी सगळे सारखेच की ! आजच्या जागतिकीकरणाच्या युगातही “हिंदी चीनी भाई-भाई” हे अगदी लागू पडते. 

जागतिकीकरण आणि हिंदी चीनी भाई-भाई 

एकूण आशिया व आफ्रिकी देशांच्या मानगुटीवर गोरेपणाचे भूत स्वार आहेच. जिथे जागतिकीकरण जास्त, प्रोडक्ट्सचा बाजार जास्त तिथे हा ‘ गोरेपणाचा आजार’ जास्त ! चीनी ही त्यातलेच. त्यांना अमेरिकेचं, किंवा पांढऱ्या, गोऱ्या कातडीचे आकर्षण. मग त्याच आकर्षणापायी, गोरे करतील तस आपण करायचं ! बाजारात गोरी बनवणारी क्रीम, लोशन, मास्क मोठ्या प्रमाणावर दिसली. जाहिरातींमध्येही पाश्चात्यांचा मॉडेल म्हणून वापर केलाजातो. 

इतकी लोकसंख्या असलेले हा देश असल्यानी परिणामी मोठा ग्रहक वर्ग आहे. नफेखोर कंपन्यांना ह्या लोकांची नाडी सापडली आहे. मग ते म्हणतील तसं, तीच मूल्य श्रेष्ठ! “गोरेपणा हा श्रेष्ठ, काळा रंग म्हणजे उणीव”. लोकांना भुरळ पडण्याच, त्यांची सारा-सार विचार करण्याची बुद्धी बंद करण्याचं सामर्थ्य आकर्षक जाहिरातीत असतं. अगदी मूल्य परिवर्तन करण्याचं. एकूण ह्या कंपन्यांनी आपल्याला मानसिकदृष्ट्या आजारी, निर्बुद्ध बनवलच आहे. ते जसे खेळवणार तसे आपण खेळायचे. 

जागतिकीकरण म्हणा किंवा अमेरिकीकरण त्याचा मोठा प्रभाव भारतासारखाच सर्वत्र दिसला. मोठ्या शहरात जागोजागी मॅकडोनाल्डस, के.एफ.सी., स्टार बक्स- ची दुकाने दिसतात. आपल्यासारखीच त्यांचीही तरुण पिढी तिथे गर्दी करून असते. आपल्यासारखाच या कंपन्यांनी चीनी चवीला साजेसे बदल त्यांच्या उत्पादनात केलेत. या कंपन्यांच्या अत्यंत आकर्षक जाहिरातीचा भडीमार सार्वजनिक ठिकाणी, प्रसारमाध्यमांमध्ये होत असतो. स्वाभाविकपणे त्या लहानग्यांना, युवा पिढीला भुरळ पाडतात. 

चीनी युवा पिढी 

साधारणपणे १९८० नंतर जन्मलेली मुले ही आजची चीनी युवा पिढी. त्यांच्यात आणि त्यांच्या पूर्वीच्या १-२ पिढ्यांत खूप फरक दिसतो, जो स्वाभाविकही आहे. नवीन पिढी स्वकेंद्रतीत दिसते आहे. इंटरनेट, ब्लॉग्सच्या माध्यमातून व्यक्त होते आहे. याच माहितीजालाने माहितीचे भयंकर शस्त्र आता सामान्य नागरिकांना घर बसल्या मिळाले आहे. सावध चीनी राज्यकर्त्यांना ह बदल दिसतोय. एकूण माहितीजालावर येणाऱ्या माहितीवर बारीक लक्ष चीनी सरकार ठेवून आहे. चीनमध्ये फेसबुक, यु ट्यूब, ट्वीटर इत्यादी संकेतस्थळांवर बंदी आहे. 

या माहितीजाळाच्या पसाऱ्याची एक चुणूक म्हणजे हे एक उदाहरण. काही महिन्यापूर्वी जपानमध्ये जेव्हा त्सुनामी आली आणि त्यातून आण्विक प्रदूषण झाले तेव्हाचे... या प्रदूषणामुळे समुद्राचे पाणी आणि परिणामी मीठही आरोग्यास हानिकारक झाले आहे. त्यामुळे आता पुन्हा बाजारात नव्याने जे मीठ येणार ते प्रदूषित, आरोग्यास हानिकारक असणार. अशा बातम्या ब्लॉग्सच्या माध्यमातून इतक्या झपाट्याने पसरल्या कि घाबरून लोकांनी मोठ्या प्रमाणात मिठाचा साठा करून ठेवला. परिणामी काही तासातच शांग-हाय आणि इतर अनेक शहरांच्या च्या बाजारातून मीठ नाहीसे झाले होते. 

एकूणच तरुण पिढी माहितीजाल, आधुनिक उपकरणे यांच्याच सहवासात राहत असावी असं वाटणारी दृश्य आजूबाजूला दिसली. आत्ता आत्तापर्यंत जगाशी फारसा संबंध न आलेले चीनी आता इतर देश, त्यातील परिस्थिती याबद्धल जाणून घेण्यास उत्सुक असावेत. मोठ्या शहरतील सार्वजनिक वाहतुकीच्या मेट्रो, बस यात तर सर्रास सगळी तरुण मूलं-मुली हातातल्या आधुनिक अशा मोबाईल, आय-पॅड वर अखंड काहीतरी शोधत किंवा खेळत असतात. ही तरुण मूलं-मुली आजूबाजूला पाहतच नाही. 

सध्या चीनी मुलींच्या आत्मकेंद्रिपणावर टीका सुरु आहे. (जणू काही मुले तशी नाहीतच ) एका टीव्ही वरील टॉक-शो मध्ये एका मुलीने, “ मी जन्मभर मोटारसायकलवर मागे बसून हसण्यापेक्षा फेरारी मध्ये बसून रडणे पसंद करीन ” असं विधान केलं होतं. श्रीमंतीची, भौतिक साधनंची ओळख ह्या देशालाही, ह्या पिढीला खरोखर गेल्या ३०-३५ वर्षातच झाली आहे. त्यामुळे आजच्या १९८० नंतरच्या पिढीला कमी कष्टात, फटाफट नवश्रीमंत होण्यात जास्त रस आहे. ही युवा पिढी स्वकेंद्रित, बिनधास्त, पाश्चात्यीकरण झाल्यासारखी, काहीशी हरवलेली वाटली. माओच्या चीन मधील ‘सांस्कृतिक क्रांतीने’ जे स्वत्व धुवून टाकलं, जी नवीन मुल्ये प्रस्थपित केली त्याची ही फळ म्हणायला हरकत नाही! चीनी सरकारला आता कळून चुकलाय कि जर युवा पिढीला वाचवायचे असेल, हे नवसांस्कृतिक आक्रमण आवरतं घ्यायचे असेल तर उपाय करायला हवेत.पण नेमका कोणता उपाय हा सरकारपुढील मोठा प्रश्न आहे .


स्वसंकृती जतन : सरकारपुढील महत्त्वाचे धोरण 

१९६० च्या दशकातील कडवी माओवादी सांस्कृतिक क्रांती ही एक मोठी चूक होती असं उघडपणे बुद्धिवंत बोलू लागलेत. चेअरमन माओच्या व्यक्तिगत आयुष्यावर, त्याने घेतलेल्या निर्णयांवर लोक टीकात्मक बोलू लागलेत. ही चीनमध्ये होऊ घातलेल्या परिवर्तनाची, सत्ताबदलाची नांदी आहे असे म्हणयला हरकत नाही. नुकताच झालेला बो शिलाय या उभरत्या नेत्याचा पाडाव हे सध्याच्या राजकारणातील कडव्या माओवादाच्या पुनरुत्थानाचा पराभव मानला जातो. कारण बो शिलाय ने छोंगछीग आर्थिक मॉडेल आणि लाल क्रांतीगीतांच्या प्रसारातून पुन्हा एकदा ६० च्या सांस्कृतिक क्रांतीच्या स्मृती जाग्या केल्या होत्या. 

स्वकेंद्रितता, चंगळवाद, बोकळलेला भ्रष्टाचार, नैतिक मुल्यांची घसरण याला उपाय म्हणून आता माओला नव्हे तर गौतम बुद्धाला एकदा आवाहन केल जात आहे. सरकारकडून बुद्ध मंदिर, बुद्धाची विचारसरणी यांचा प्रचार सुरु आहे. क्न्फुशस चे पुनरुज्जीवनसुद्धा अगदी रिती-रीवाजांसह केले जात आहे. पारंपारिक सण साजरे करणे, त्याचं महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवणे असो किंवा “छीपावो” ने सजलेली दुकाने असो (छीपावो म्हणजे चीनी स्त्रियांचा अंगालगत बसणारा पारंपारिक पोषाख.)! एकूणच स्वसंकृती जतन किंवा स्वसंकृती उत्खनन म्हणा, हे एक सरकारपुढील महत्त्वाचे धोरण दिसते आहे. 

वृद्धांचा देश आणि दुसरे मुल 

क्न्फुशसने कुटुंब पद्धतीवर खूप भर दिला होता. आज जसजसा चीन वृद्धांचा देश होऊ लागलाय तसतस क्न्फुशसप्रणीत कुटुंब पद्धती, मुलांची माता-पित्यांबद्दलची कर्तव्ये यांना आता सरकारी महत्त्व आलाय. दररोज वर्तमान पत्रात त्या संबंधी प्रबोधनपर रकाने देखील असतात. 

वृद्धांना पेन्शन, आरोग्याच्या सवलती, सार्वजनिक बसमधून प्रवास मोफत अशा योजनांमुळे सरकारी तिजोरीवर त्याचा ताण पडतो आहे. परिणामी, एक अपत्य धोरणही आता सैल केले आहे. जे दाम्पत्य आपल्या आई-वडिलांचे एकुलते एक अपत्य आहे अशा दाम्पत्याला दुसरे मुल होऊ देण्यास आता परवानगी आहे. इतक्या लोकसंख्येमुळे जीवनावश्यक गरजांच्या, संसाधनांच्या पुरवठ्यावर अधिक ताण येत असला तरी सरकारला ही कसरत करावी लागते आहे असं दिसतंय. त्यातून मग अन्नधान्य सुरक्षिततेसारख्या समस्या निर्माण होत आहेत. 

अन्नधान्य सुरक्षितता 

आकडेवारीच्या भाषेत बोलायचे झाले तर जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी साधारण २२ % लोक चीनी भूभागावर राहतात. तर चीनमधील फक्त १० % जमीन लागवडीयोग्य आहे. या पार्श्वभूमीवर, देशाच्या एकूण गरजेच्या सुमारे ९५% शेती उत्पादनात स्वयंपूर्णता मिळवण्याचा विडा चीनने उचलला आहे. स्वाभाविकपणे चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर रासायनिक खते, जनुक तंत्रज्ञान वापरून फळ-भाज्याचे उत्पादन केले जाते. परिणामी उत्पादनाचा दर्जा घसरला आहे. 

याचं अगदी ताजं उदाहरण म्हणजे कलिंगड स्फोट प्रकरण. कलिंगड लागवड करताना वापरलेल्या रासायनिक खताचं प्रमाण अधिक झाल्यामुळे ढिगाने कलिंगड फटाफट फुटून गेली. या प्रकरणामुळे लोकांनी भीतीने कित्येक दिवस कलिंगड घेणेच थांबविले होते. परिणामी बाजारातली कलिंगड अक्षरश मातीमोल झाली होती. 

येनकेनप्रकारेण पैसा मिळवायच्या वृत्तीमुळे खाद्यापदार्थांत भेसळीच्या समस्येने विक्राळ रूप धारण केले आहे. २००८ मध्ये लहान मुलांच्या दुध पावडरचे प्रकरण खूप गाजले होते. दुध पावडर मध्ये मेलामाईन हे प्लास्टिक भेसळ केल्यामुळे अनेक लहानग्यांना जीवाला मुकावे लागले, तर काहींना कायमस्वरूपी अपंगत्व आले. हे प्रकरण इतके भयंकर होते की कधीही दुध पावडर न चाखलेल्या आमच्या १ वर्षाच्या मुलालाही अनेक शारीरिक चाचण्या, इंजेक्शन्सला सामोरे जावे लागले. आपल्यापैकी काहींना चीनमध्ये प्रयोगशाळेत अंडी कशी बनवतात ही इमेल आली असेलही. एकूणच चीनमध्ये राहताना अन्नधान्य सुरक्षितता ही काळजीची गोष्ट होती. तिथे दररोज काहीना काही गंभीर अन्नधान्य भेसळ प्रकरणे मोठ्या प्रमाणावर बाहेर येत आहेत. 

आयात कमीत कमी करायची, आंतरराष्ट्रीय बाजारात स्वतःच्या चलनाला मानाचे स्थान मिळवून द्यायचे असं ठरवल्यावर हे सगळं अपरिहार्य असाव का असा प्रश्न पडतो. 

आंतरराष्ट्रीय बाजारात चीनी चलनाचे स्थान 

आर.एम.बी. (Renmin Bi – people’s currency ) हे चीनी चलन पारंपारिक भाषेत ‘युआन’ किंवा ‘ख्वाय’ म्हणूनही ओळखले जाते. आजच्या तारखेनुसार डॉलरच्या तुलनेत चीनी चलन भारतीय चलनापेक्षा ८ पट ताकदीचे आहे. एका डॉलरसाठी आपल्याला साधारण ५५ रुपये मोजावे लागतात तर चीनी माणसाला ६ आर.एम.बी. तर एक चीनी आर.एम.बी. साठी भारतीयांना साधरण ९ रुपये मोजावे लागतात. कारण चीनमध्ये आयाती पेक्षा निर्यात जास्त आहे. त्यांचा जी.डी.पी.चा आकडाही वाढीच्या मार्गाने जाणारा आहे. शिवाय वाढती परदेशी गुंतवणूक आहेच या आणि अशाच कारणांमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात आपल्यपेक्षा चीनी चलनाची पत वरचढ आहे. 

फेब्रुवारी २०१२ दरम्यान भारतात झालेल्या ‘ब्रिक्स परिषदे’त सदस्य राष्ट्रांनी (ब्राझील, रशिया, इंडिया, चीन आणि साउथ आफ्रिका) परस्परांतर्गत व्यापारासाठी डॉलर ऐवजी स्वतःच चलन वापरण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. हे पाचही देश म्हणजे आजच्या घडीला जगातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्था आहेत. जाणकार असं म्हणतात की काही वर्षातच चीनी जी.डी.पी.चा आकडा हा अमेरिकन जी.डी.पी.चाच्या पुढे जाणार आणि अमेरिकन डॉलरची जागतिक बाजारातील जागा चीनी युआन घेणार. अगोदरच, जगभरातील बहुतांशी सगळ्या देशाच्या बाजाराचा ताबा “मेड इन चायना” च्या वस्तूंनी घेतला आहेच. पण या सगळ्याबरोबर “वापरा आणि फेका” सारखी मूल्य सुद्धा चीन निर्यात करतो आहे असं वाटतं. 

वापरा आणि फेका 

गेल्या ५ वर्षात, चीनमध्ये कधीही, कोणीही हातरुमाल वापरताना दिसले नाही. त्या ऐवजी ते लोकं (स्रिया आणि पुरुषही) टीश्यु पेपर वापरतात. एकूणच सर्वत्र “ वापरा आणि फेका” हा दृष्टीकोन पाहायला मिळाला (वस्तूच्या बाबतीत आणि काहीवेळा माणसांच्या बाबतीतही). स्वस्त मालाचा, हलक्या गुणवत्तेच्या वस्तूंचा इतका सुळसुळाट आहे कि लोक एकदा स्वस्त वस्तू घेतात वापरतात आणि ती फेकून देतात. दुरुस्ती, पुनर्वापर वैगेरे प्रकार नाहीच. हे अगदी दैनंदिन वापराच्या वस्तूपासून ते इलेक्ट्रोनिक उपकरणांच्यापर्यंत सरसकट आढळले. याउलट आपण सर्वसामान्य भारतीय एकदा वस्तू घेतली की ती जास्तीत जास्त काळ वापरत राहतो, परत परत दुरुस्त करून वापरतो. 

खर तर, आज चीनी वस्तुंनी बाजार भरले आहेत, आपल्याला कितीही जपावे वाटले तरीही ! हलक्या दर्जाच्या वस्तू घेताना केवळ पर्याय नाही म्हणून आपण घेतो असं जाणवलं. कारण मुळातच भारतात ते इतके स्वस्त मिळतात मग दर्जाचा फार विचार न करता घेतो आपण. विशेषतः शोभेच्या वस्तू किंवा प्लास्टिकच्या बरण्या-डबे अशा वस्तू, खेळणी याबाबत हे जास्त दिसते. मुलं बाजारात गेल्यावर खेळण्यासाठी हट्टच करतात, मग १५० रुपयांचं चांगले खेळण घेण्याऐवजी २० रुपयांचं चीनी बनावटीच खेळण आपण घेऊन देतो. तात्पुरती का होईना आपण खूष, मुल खूष. एकतर वेळ निभावून जाते आणि पैसे कमी लागतात. पण एकूण वापरा आणि फेका हे मूल्य आपल्यालाही स्वीकारावं लागलाय हे खरं आहे. 

या वरून “१२७ अवर्स” हया सत्य कथेवर आधारित सिनेमाची आठवण झाली. या सिनेमातील मुख्य कलाकार घळी मध्ये अडकून पडलेला असतो. सुटका करण्यासाठी स्वतःच्या जवळील सर्व हत्यारे तो वापरून बघतो. त्याच्याकडे एक चाकू असतो. त्या चाकूने तो दोरी कापण्याचा प्रयत्न करतो. पण फसतो. तेव्हा तो म्हणतो, “ डोन्ट बाय द चीप, मेड इन चायना मल्टी टूल. आय ट्राइड टू फाईंड माय स्वीस आर्मी नाईफ, बट...धिस थिंग केम फ्री विथ अ पलॅश लाईट. पलॅश लाईट वॉज अ पीस ऑफ शीट टू!!” एकूण काय तर, “वापरा आणि फेका” हे जगालाच स्वीकारावं लागलय आणि त्याला चीन आणि आपणही जबाबदार आहोतच. 

भारत आणि चीन या दोन्ही अतिप्राचीन सभ्यता, संस्कृती. सांस्कृतिक, आर्थिक, वैचारिक देवाणघेवाणीचा प्राचीन इतिहास असलेली ही दोन महान राष्ट्रे. दोन्हीच्या इतिहासात डोकावले तर अनेक साम्यस्थळे सापडतात. चीन आणि भारताच्या तथाकथित प्रगतीचा आढावा घेतला तर काय चित्र दिसते ? 

चीन, जागतिक महासत्ता होऊ पाहणारा किंबहुना झालेला देश. ज्याची स्पर्धा अमेरिकेशी आहे आणि ज्याच्याबद्धल जगभर उत्सुकता, कुतूहल आहे. भारत, ज्याला जगातील सगळ्यात मोठी लोकशाही म्हणून संबोधले जाते. ज्याच्याबद्धल सुद्धा जगभर उत्सुकता, कुतूहल आहेच. 

चीन आणि आपल्यात फरक वाटला तो मानसिकतेचा. चीनी मानसिकता भावनांपेक्षा तर्काला महत्त्व देते. तसाच त्यांचा आचार-विचार आहे. व्यवहाराचा विचार येतो तेव्हा चीनी भावना बाजूला ठेवतात. नागरिकांच्या व्यक्तीगत हक्कांपेक्षा पार्टीने ठरवलीले राष्ट्रहित मोठे हे चीनचे धोरण आहे. चीनने जी काही तथाकथित प्रगती केली आहे त्यामागे कायद्याचा वचक, दहशद, शिस्त, प्रसंगी मानवी हक्कांची पायमल्ली आहे. 

भारताच्या प्रगतीला अधिक टिकाऊ मानणे हे आजकाल प्रचलित आहे. पण पक्षीय मतमतांतराच्या गलबल्यात आणि एकमेकांवर कुरघोडी करू पाहणाऱ्या दबावगतांच्या राजकारणात मुख्य प्रगतीची वाट बऱ्याचदा हरवल्यासारखी वाटते. 

चीनी आणि भारतीय जनतेने स्वतःच्या प्रगतीसाठी वेगवेगळ्या राजकीय, आर्थिक वाटा निवडल्या आहेत. त्यांचे आपापले गुण-दोष आहेत.प्रसंगी दोन्ही देशांना कुम्पणपलीकडचे गवत अधिक हिरवे वाटते. म्हणूनच या दोन खंडप्राय पौर्वात्य शेजारी देशातील घडामोडींचा, वाटचालीचा अभ्यास अत्यंत रंजक आहे. 


शुक्रवार, २३ नोव्हेंबर, २०१२

गोष्ट हुआंग दी ची


ही गोष्ट आहे चीनच्या इतिहासपूर्व काळातील.  चीनच्या शैशवातील, बाल्यावस्थेतील. 

आपल्यासारखीच चीनमध्ये सुद्धा पितृसत्ताक समाजव्यवस्था होती. ह्या व्यवस्थेतील आदिम जमातींचे हे प्रमुख, म्होरक्या, म्हणजेच सम्राट. चीनच्या इतिहासपूर्व काळात पाच सम्राट विशेष प्रसिद्ध होते. या पाच सम्राटाशिवाय अनेक छोट्यामोठ्या टोळ्या सुद्धा चीनभर होत्या. ते   पाच सम्राट म्हणजे चुआन त्सुई, दिखू, याव, श्वन आणि  कथानायक, हुआंग  दी.   

चीनी भाषेत हुआंग म्हणजे पीत किंवा पिवळा.  (चीनी लोकांना पीतवर्णी म्हणून ओळखले जाते !  आणि चीनची प्रमुख नदी सुद्धा  "हुआंग ह " म्हणजेच   "पीत नदी" !  ) आणि  दी म्हणजे देव किंवा सम्राट. जन्मजात बुद्धिवान असलेला हुआंग  दी मोठा झाल्यावर त्याच्या जमातीचा प्रमुख म्हणून निवडला गेला. आपल्या सहकाऱ्यांना, मित्रांना कायम मदतीस तत्पर असा त्याचा स्वभाव होता म्हणे. शूर  हुआंग  दी ने यांदी नावाच्या जमातीचा पराभव केला आणि हि यांदीची जमात त्याच्या अधिपत्याखाली आली. हि नवीन जमात आता "यान-हुआंग" जमात म्हणून ओळखली जाऊ लागली. हुआंग दी त्याचा प्रमुख झाला.  त्याने यांदीला आपला सहाय्यक म्हणून नेमले. असं म्हणतात, आज अस्तित्वात असणाऱ्या चीन राष्ट्राच बीजारोपण ह्याच "यान-हुआंग" संकरात झाले.  चीनी लोक स्वतःला " हुआंग दी आणि यान दी चे वंशज म्हणवतात !  

ह्या हुआंग आणि यान जमाती एकत्र झाल्या पण त्यांची संकट काही संपली नाहीत. त्यांच्या ताब्यातील भूप्रदेशाच्या दक्षिणेकडून एका जमातीने त्यांच्या वर हल्ला करण्याची योजना आखली. ह्या जमातीचा प्रमुख म्हणे फार उद्धाम होता. पूर्वी एकट्या असणाऱ्या यांदीचा त्याने पराभव केला होता.  त्यामुळे त्याला वाटले की ह्या यान-हुआंग टोळ्या माझ्यापुढे "कीस झाड कि पत्ती !" 

अस म्हणतात की,  हा टोळीप्रमुख (छौ)अत्यंत अक्राळ-विक्राळ, सामर्थ्यवान होता. त्याला ८१ भाऊ होते. त्यांना मानवी डोकी आणि प्राण्यांची शरीरे होती. प्रत्येकजण अष्टभूज होता. लोहासम कठीण असं त्यांचा भालप्रदेश होता. रंगीबेरंगी मुखवटे धरण करणारे हे बंधू माती आणि दगड सुद्धा खाऊन फस्त करत ! असली महाभयंकर टोळी चालून येणार ही बातमी कळताच या हुआंग आणि यान टोळ्यानी जय्यत तयारी सुरु केली. दगड कोरून त्यापासून धारदार कुर्हाडी, चाकू अशी शस्त्रास्त्रे मोठय प्रमाणावर तयार केली. आणि त्याला तोडीस तोड असं सैन्य आणि सैन्याला प्रशिक्षणही. इतकच नव्हे तर अत्यंत शास्त्रीय, सूक्ष्म अशी व्यूहरचनाही तयार केली. 

ह्या दोन जमातीत एक घनघोर लढाई झाली. त्याला तोंड फुटले ते  "हुआंग ह- पीत नदीच्या उत्तरेला. (आजच्या चीनच्या उत्तर-पूर्व दिशेला) "सर्व नद्यांना बांध घाला, त्या अडवा." अशी सूचना   हुआंग  दी ने आपल्या सेनापतीस दिली. जेणेकरून चालून आलेले सैन्य प्रचंड हुआंग ह च्या पात्रातच बुडून अखेरचा श्वास घेईल. 

प्रत्यक्षात मात्र तसं होऊ शकल नाही. कारण म्हणे पवन देव आणि पर्जन्य देवतेची खास मर्जी ह्या चालून  येणाऱ्या टोळी प्रमुखावर होती.  त्यांनीच   भयंकर वादळ आणि पाऊस पाडून यान-हुआंग दी च्या सैन्याची दाणादाण उडवली. यान-हुआंग दी ने हान बाव नदीला साकड घातले. प्रत्युत्तरादाखल तिने रणरणत्या उन्हाच अस्त्र वापरले. आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. 

पहिल्याच टप्प्यात नामुष्की झालेल्या आक्रमणकारी टोळीला त्याची सर्व अस्त्र, शक्ती  वापरायला भाग पडल. जादूटोण्याचा वापर करून त्याने गडद धुके निर्माण केले. जे म्हणे तीन दिवस, तीन रात्र होते. परिणामी, यान-हुआंग च सैन्य आपल्या दिशा धुक्यात हरवून बसले. शत्रूसैन्या दृष्टीपथात येणे अशक्य वाटल्यावर हुआंग  दी ने सैन्याला आपापसात एकत्र राहण्याची सूचना दिली. त्याने सेनापतीस आदेश दिला कि, एक दिशादर्शक रथ तयार करण्यात यावा. जेणेकरून धुक्यातही दिशा ज्ञान होईल. सेनापतीने रथ तयार केला. ह्या रथाच्या मदतीने शत्रूच्या मुख्यालयावरच हल्लाबोल झाले.

त्यावेळी हे शत्रूसैन्या आपल्या मुख्यालयात आनंदोत्सवात मग्न होते. यान-हुआंग च सैन्य धुक्यातच हरवले आणि मी विजयी झालो अशा भ्रमात ते होते. या अनपेक्षित आक्रमणामुळे ते पुरते गोंधळून गेले. यान-हुआंग ने त्यांच्या प्रमुखास बंदी बनविले. ह्या अभूतपूर्व लढाई नंतर यान-हुआंग आणि हा छौ ह्या तिन्ही जमाती एकत्र झाल्या. जणू हळूहळू विस्तारत जाणाऱ्या चीनची ही  नांदीच होती.

तृप्ती